Life of Stories Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
-
- Para toda la familia
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
-
# 1494: डोंगरगावची पाणीबाणी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
न्यूज चॅनलवाल्यांनी याचं पुन्हा एकदा फीचर केलं. त्याचा छोटासा इंटरव्ह्यू घेतला.ढसाढसा रडला म्हातारा. म्हणाला, "'मारवाडातलं गाव होतं माझं....पण एकदम कोरडं ठाक!! पाण्यासाठी चार चार किलोमीटर वणवण फिरायची आई माझी. आणि आईबरोबर मीही.एक एक थेंब प्राण कंठाशी आणायचा. पाण्यात देव दिसायचा. इथली उधळमाधळ बघितली की जीव तुटतो माझा. मला पता आहे, लोक माघारी माझी टिंगल करतात. पन धापैकी एक मानस तरी ऐकतो. माझा काम झाला की मग....!!‘
-
# 1493: काश्यप ऋषींचे काश्मीर. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
दुसऱ्या दिवशी, शंकराचार्यांना उपवास घडला हे ऐकल्यावर त्या दाम्पत्यास अतिशय वाइट वाटले.शिष्यांनी रात्री पाकसिद्धीसाठी वन्हीच उपलब्ध नसल्याचे सांगितले. तेव्हा त्या गृहिणीने थोडे पाणी हातात घेऊन मंत्रित करून लाकडांवर शिंपडून अग्नी प्रज्वलित केला हे बघुन शंकराचार्यांना मोठेच आश्चर्य वाटले. काश्मीरच्या सामान्य जनांकडूनही खुप काही शिकण्यासारखे आहे हे शंकराचार्यांना कळून चुकले होते.
-
# 1492: "ते तर मला येतय्". लेखक : डॉ. कैलास दौंड. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
येत नाही हे कबूल करण्या ऐवजी "ते तर मला येतय्" असा धोषा लावला की अशी फजिती होते ....!
-
# 1491: तसबीर तेरी दिलमे . लेखक श्री. संभाजी गायके.कथन: ( मीनल भडसावळे )
ही गोष्ट स्वीडनची राजकन्या आणी एका महान कलाकाराच्या प्रेमाची आहे. फार खडतर प्रवास करून त्याने स्वीडन ह्या देशात पोचण्याची आहे. शार्लटची चारूलता होण्याची आहे.
-
# 1490: नि:शब्द पान्हा. . कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
"दिस उजाडला की हंडा घेऊन पाणी भरायला कोसभर दुर जाव लागत. घरात पोटभर खायला नाय. घाम फुटतो पण पान्हा फुटना. तुम्हीच सांगा कुठून ह्याची भूक भागू ?"औषध नक्की कुणाला देऊ ?ज्याला भूक लागलीय म्हणून तो रडतोय त्या बाळाला, की दुध येत नाही म्हणून आईला ?की परिस्थितीला ?
-
#1489: रामरक्षा नाही तर नुसती बाराखडी म्हण". लेखिका निता च. कुलकर्णी. कथन ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
सकाळी उठली तर तिला बोलताना जीभ जड झाली आहे हे जाणवले. बोलणं अस्पष्ट यायला लागलं . डॉक्टर म्हणाले,, घरी गेल्यानंतर तुम्ही मध्यम आवाजात रामरक्षा म्हणा. त्यात र शब्द अनेक वेळा आहे त्याचा परिणाम होतो .प्रत्येक शब्द म्हणताना तोंड जमेल तेवढं उघडा.. जबड्याची हालचाल जास्तीत जास्त झाली पाहिजे. विष्णू सहस्त्रनाम म्हणालात तर अजूनच उत्तम..."