स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum Santosh Deshpande
-
- Arts
-
A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel.
स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.
-
`एआय`च्या युगात करिअरच्या दिशा कुठल्या?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञान वेगाने सर्वत्र विस्तारत आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यात चांगले करिअर घडण्यासाठी काय शिकायला हवे, कोणता दृष्टिकोन विकसित करावा लागेल, याची माहिती सर्वांना असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, स्टोरीटेल कट्ट्यावर याच विषयी मार्गदर्शन केले आहे, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या संवादातून. प्रत्येक सजग पालकाने आणि करिअरविषयी गंभीर असणाऱ्या विद्यार्थ्याने ऐकायलाच हवा, असा हा पॉडकास्ट.
-
संवाद...एका `संवादमित्रा`शी!
सुनील महाजन म्हणजे आपल्या सांस्कृतिक चळवळीस वाहून घेतलेले एक अवलिया व्यक्तिमत्व. आपल्या `संवाद, पुणे या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आजवर बालनाट्य चळवळ, नाटक, चित्रपट, साहित्य अशा विविध प्रांतांत विलक्षण उत्साहाने अनेक संकल्पना रुजविल्या, त्यातील व्यक्तिमत्वं घडविली, माणसं जोडली आणि त्यांच्या सुखदुःखाच्या क्षणी खंबीरपणे पाठीशीही उभे राहिले. नुकतेच त्यांनी वयाची ६१ वर्षे पूर्ण केली आणि त्यानिमित्त त्यांना संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं तेव्हा उलगडला तो त्यांचा थक्क करणारा प्रवास. सांस्कृतिक चळवळीतील सच्चा कार्यकर्ता असं बिरुद अभिमानाने मिरवू पाहणाऱ्या सुनील महाजनांचा हा प्रवास, त्यांना आलेले अनुभव ऐकणं, हा देखील एक समृद्ध करणारा अनुभव ठरतो.
-
`भविष्य नावाचा इतिहास` लिहिताना...
आजच्या बदलांचा वेग लक्षात घेता भविष्यातील मानवजीवन, त्याची व्यवस्था, तेव्हाचे जगाचे मानसिक वास्तव याचा भेदक वेध घेणारी विलक्षण कादंबरी प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांनी लिहिली आहे. ती नुकतीच प्रकाशित झाली. त्यानिमित्ताने आजचे भविष्य अन् उद्याचा इतिहास यांच्या दरम्यान उलगड जाणाऱ्या अनेक पैलूंचा वेध एका विलक्षण कथानकातून कसा घेता आला, याची उलगड संजय सोनवणी यांनी संतोष देशपांडे यांच्यासमवेत रंगलेल्या या गप्पांमधून केली आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी उद्योगक्षेत्रात काळाच्या पुढचा विचार करीत सोनवणी यांनी स्वतः ज्यावर मोठे काम केले होते अशा `हेलिकार` तसेच `कॉन्टम फिजिक्स`सारख्या संकल्पनांची उकलही या संवादातून प्रथमच श्रोत्यांपुढे होते. प्रत्येकाचे आवर्जून ऐकावा असा हा संवाद नवी दृष्टी देऊन जातो.
-
राजकवी तांबेंच्या `भारा`वलेल्या आठवणी...
मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जातात, असे राजकवी भा.रा. तांबे यांच्या कवितांचे गारुड तब्बल शंभर वर्षांहून अधिक काळ रसिकांवर टिकून आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय, कळा ज्या लागल्या जीवा, नववधु प्रिया मी बावरते, मधु मागसि माझ्या सख्या परि, कशी काळनागिनी, घन तमी शुक्र बघ राज्य करी, तिन्ही सांजा सखे मिळाल्या अशा त्यांच्या कित्येक रचना आपल्या अंतरीचा तळ ढवळतात. अशा या राजकवींचे नातू शिरीष तांबे यांनी संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादातून आपल्या आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या संवादातून त्यांनी तो काळ आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो आणि ऐकता ऐकता आपणही `भारा`वून जातो...स्टोरीटेल कट्ट्यावरील हा खास पॉडकास्ट जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा.
-
`शहिदांच्या पत्रां`ची गोष्ट...
देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे हुतात्मे म्हणजे भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव. 93 वर्षांपूर्वी या तिघांना फाशीवर चढविण्यात आले. मात्र, आपल्या बलिदानातून त्यांनी तरुणाईला देशासाठी निधड्या छातीने जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या बलिदानाचे स्मरण चिरंतन राखण्यासाठी आजही २३ मार्च शहिद दिन म्हणून पाळला जातो. या शहिदांचा एकमेकांमधील पत्रव्यवहार जेव्हा पुढे आला, तेव्हा त्यांच्या मनातील अंतरंगाची, त्यात दडल्या भावनांची हळवी आणि तितकीच ठाम अशी उलगड होते. ती समाजापुढे आणण्यासाठी हरहुन्नरी असे ज्येष्ठ कलाकार सुधीर मोघे यांनी मोठ्या प्रयत्नांतून `शहिदांची पत्रे` नावाने अत्यंत हृद्य असे सादरीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचीच उलगड करण्याचा प्रयत्न केला आहे संतोष देशपांडे यांनी. देशप्रेमाचा ओलावा मनात जपतानाच, ध्येयाचा अंगारही फुलविणारी ही शहिदांची पत्रे सर्वांपुढे आलीच पाहिजेत, अशा हेतूने हा संवादही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू या.
-
`ती` आनंदी तर घर सुखी...
कुटुंबातील महिला ही खरंतर त्या घराला पुढे घेऊन जात असते. घरात कोणी आजारी पडले तरी त्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाण्याचे धैर्य तिच्यात पुरुषांच्या तुलनेत खचित अधिकच असते. अशी ही स्त्री आजारी पडली तर घरची अख्खी घडी विस्कळीत होऊन जाते. मग, हे असं का घडतं, याचा वैद्यकशास्त्राच्या दृष्टिकोनातून मागोवा घेतला आहे पुण्यातील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. नेहा कुलकर्णी यांनी, संतोष देशपांडे यांंसमवेत रंगलेल्या या विशेष पॉडकास्टमधून. आपल्या कुटुंबातील स्त्रीला आनंदी राखलं तर तिचं शारीरिक व मानसिक स्वास्थही आपोआप चांगलं राखलं जातं. त्यासाठी काय करायला हवं, याची छानशी उलगड डॉ. नेहा कुलकर्णी यांनी करुन दाखवली आहे, जी प्रत्येकाने ऐकायलाच हवी.
Customer Reviews
पुस्तकं कुठ आहेत?
यात जी काही मेंशन केली आहेत ती पुस्तकं कुठ आहेत हे कळल नाही. स्टोरीटेलवर की आणखी कूठ? स्टोरीटेलवर तर काही सापडलं नाही.
No audiobooks at all
I searched lot but did not found any audiobook here.... disappointing
Nice podcast
Ye nahi suna to kya Suna!