Madhavi Gitesh Kulkarni Trupti deshpande-kulkarni
-
- Arts
God's best creature is Man. The best part is we can think, feel and express our emotions.These episodes will take you to the ride of roller coaster of emotions.
-
Audio book Marathi (वि.स.खांडेकर) अमृतवेल (कादंबरी)
अलकनंदा एम.ए. शिकलेली हुशार, ध्येयवादी आणि गोड तरुणी. एका सुसंस्कृत आणि प्रेमळ कुटुंबात वाढलेली.अभाळासारखी माया करणारे दादा आणि जमिनिसारखं जपणारी माई,.नंदा मावशी, नंदा मावशी" म्हणणारा लहानगा मिलिंद.मिलिंदची आई वारली तेव्हा त्याच्या बाबांनी दुसरं लग्न केलेलं. सावत्र आई मिलिंदला न सांभाळणारी.माई, दादा आणि नंदा हेच त्याच विश्व!
एके दिवशी नंदाला घरी परतायला झालेला उशीर पाहून दादांचं काळीज काळजीने वरखाली होत होतं. नंदाच्या खोलीत ते तिची पुस्तके चाळत बसले.त्यात त्यांना नंदाने लिहलेल पत्र सापडतं. ते पत्र दादांनाच लिहिलं होतं, पण आपल्या आयुष्यातील वादळ दादांसमोर व्यक्त न करता येण्यासारखं वाटल्यामुळे मनातला अतोनात कोलाहल तिने या पत्रात लिहिला होता. दादांना कधीही न देण्यासाठी! पत्र वाचून दादा गहिवरले.त्यांनी खूप विचार केला,मन सावरलं आणि नंदाची समजूत काढणारे पत्र लिहून तिच्या टेबलावर ठेवलं.नंदा उशिरा घरी येते.झोप न आल्यामुळे पुस्तकं चाळायला गेली असता तिला दादांनी लिहिलेलं पत्र सापडतं.आधी गोंधळून गेलेली नंदा नंतर शांत होते. -
-
-
-
-
नजारे..!
माझ्या घराच्या balcony मधे एक जास्वंदाच झाड आहे.. त्याला तीन शाखा आहेत.. एक अगदीच लहान..एक मध्यम आणि एक प्रमाणापेक्षा मोठी.. तीनही फांद्यांना सुंदर फुलं येतात.. त्यांनी आपली आपली जवाबदारी अगदी परिपूर्ण रित्या पार पाडली आहे . . अगदी एका आईच्या तीन मुलांसारखी.. एकाच आईची तीन मुले .. एक लहानपणापासूनच हुशार आणि happy go lucky हात घालेल त्या क्षेत्रात यश मिळवून आणणारा/री.. एक एकदम परफेक्ट प्लॅनिंग lover योग्य वयात हवी ती गोष्ट घडवून आणणारी/रा... आणि एक मात्र.. मस्तमौला.. लहानपणापासूनच बिनधास्त.. कसलीही प्लॅनिंग किंवा पर्वा न करणारा/री आणि म्हणूनच फळाची (फुलाची) पर्वा न करता मनसोक्त आयुष्य जगणारी/रा... उगाच नाही म्हंटले आहे .. वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे.. सगळं कसं same same.. माणसाचं जीवन अगदी असच.. एकाच पोटच्या आईची लेकरं घ्या किंवा या सबंध पृथ्वी मातेची आख्खी मानवजात सगळ्यांचे स्वभाव वेगळे..त्यांना आयुष्यात मिळालेलं यशही वेगळं कुणाला आधी तर कुणाला नंतर.. पण म्हणून काय कुढत बसायचं.. असं म्हणतात जीवन एकदाच मिळतं.. मी म्हणेल "चूक..! मरण एकदाच मिळतं.. जीवन तर रोज जगायला मिळतं"
नजरीये बदल दिजीये जनाब.. नजारे अपने आप बदल जायेंगे