सोपी गोष्ट BBC Marathi Audio
-
- Здоровье и фитнес
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
-
अंमली पदार्थांचे शरीरावर काय परिणाम होतात? BBC News Marathi
26 जून हा दिवस अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जातो. अंमली पदार्थ आणि व्यसनांविरोधातला जागतिक लढा बळकट करण्यासाठी 1987मध्ये युनायटेड नेशन्सने हा दिवस पाळायला सुरुवात केली.
Drugs म्हणजे असे घटक वा पदार्थ ज्यांचा शरीरावर परिणाम होतो. ड्रग्सबद्दलच्या बातम्या, चर्चा सध्या सतत कानावर येत असतात. उत्तेजकं, ओपिऑईड्स, मेफेड्रोन, फेंटानिल असे वेगवेगळे शब्द कानावर पडत असतात. याचा अर्थ काय? या मादक पदार्थांमध्ये असं काय असतं, ज्याची सवय लागते? आणि या सेवनाचे शरीरावर, आयुष्यावर काय परिणाम होतात?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले -
वजन घटवण्यासाठी औषधं घेताय? सावधान! आधी हे ऐका | BBC News Marathi
वजन घटवणं किंवा Weight Loss याविषयी सगळीकडे चर्चा सुरू असतात. त्यासाठी वेगवेगळे सल्ले दिले जातात. वजन घटवण्यासाठीचा असाच एक मार्ग - एक शॉर्टकट धोक्याचा धरू शकतो असा इशारा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिला आहे.
हा इशारा आहे वेट लॉससाठीच्या एका औषधाबद्दल...हे औषध कोणतं आहे? आणि WHOने त्याबद्दल काय म्हटलंय?
Ozempic हे औषध सध्या 'Weight Loss Drug' म्हणजे वजन घटवणारं औषध म्हणून प्रसिद्ध झालंय. याला Skinny Jab असंही म्हटलं जातंय. पण याच प्रसिद्धीमुळे या औषधाचा अनेकदा तुटवडा निर्माण होतोय आणि सोबतच याच्या इतर अनेक आवृत्त्याही बाजारात आल्यायत. आणि याचविषयीचा खबरदारीचा इशारा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलाय.
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये -
प्राण्यांना तुमच्या-आमच्यासारख्या जाणिवा, संवेदना असतात का? | सोपी गोष्ट पॉडकास्ट
प्राण्यांना जाणिवा असतात का? ते विचार करू शकतात का? शास्त्रज्ञांना, संशोधकांना गेली काही शतकं हा प्रश्न छळतोय.
पण प्राणी विचार करू शकतात, त्यांना संवेदना असतात हे डार्विन यांचं म्हणणं तेव्हाच्या वैज्ञानिक समजांपेक्षा वेगळं होतं.
मग आता शास्त्रज्ञांचं म्हणणं काय आहे? प्राण्यांना conscious - म्हणजेच जाणिवा, संवेदना असतात का?
जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - पल्लब घोष
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - निलेश भोसले -
भारतीय कामगार इतक्या मोठ्या प्रमाणात आखाती देशांत का जातात? BBC News Marathi
GCC म्हणजे गल्फ कोऑपरेशन काऊन्सिलमध्ये सहा देश आहेत - सौदी अरेबिया, युनायटेड अरब एमिरेट्स (UAE), ओमान, बहारिन, कतार आणि कुवेत. 1981 मध्ये या गटाची स्थापना करण्यात आली. या सहा देशांमध्ये नोकरी - रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित होणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे.
आखाती देशांमधील कामगारांच्या परिस्थितीबाबत अनेकदा बातम्या येतात, दुर्घटनांनंतर याबद्दलची चर्चा होते. पण जगण्या-राहण्यासाठीची परिस्थिती इतकी बिकट असूनही भारतीय कामगार कामासाठी आखाती देशांमध्ये का जातात? कधीपासून जातात?
समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - अमृता दुर्वे
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - निलेश भोसले -
वर्षातून दोनदा विद्यापीठात ॲडमिशन कशा होणार? विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? BBC News Marathi
भारतामध्ये जून - जुलै महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होतं आणि एप्रिल - मे महिन्यात संपतं. पण आता मात्र विद्यापीठांना वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया घेण्याची परवानगी UGCने दिलीय.
जगभरातल्या अनेक विद्यापीठांमध्ये सध्या वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया होते. म्हणजे अमेरिकेत ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये फॉल (Fall) सीझनच्या ॲडमिशन्स होतात, तर जानेवारीमध्ये स्प्रिंग (Spring) सीझनच्या ॲडमिशन्स होतात.
वर्षातून दोनदा ॲडमिशन्स होणार, म्हणजे नेमकं काय होणार? त्याने विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? युजीसीने नेमकं काय म्हटलंय?
समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - अमृता दुर्वे
निवेदन - विशाखा निकम
एडिटिंग - निलेश भोसले -
NEET परीक्षा निकाल वादात का? परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी का होतेय? BBC News Marathi
NEET म्हणजे National Eligibility cum Entrace Test. वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज प्रवेशासाठीची ही प्रवेश परीक्षा असते. 5 मे रोजी यावर्षीची नीट परीक्षा झाली.
या परीक्षेसाठी 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23.33 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले. 4 जूनला निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षेच्या इतिहासात पहिल्यांदाच 67 मुलांना पैकीच्या पैकी 720 गुण मिळाले आहेत. पूर्ण मार्क्स मिळवणाऱ्या 67 टॉपर्सपैकी 6 जणांनी हरियाणा राज्यातल्या झज्जर जिल्ह्यातल्या एकाच सेंटरमधून परीक्षा दिली होती.
देशभरातील विद्यार्थ्यांनी या निकालावर आक्षेप घेत, परीक्षेचं आयोजन योग्य प्रकारे करण्यात आलं नसल्याचं म्हणत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केलीय.
रिपोर्ट - उमंग पोद्दार
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले