Jyoti Sakpal

Jyoti Sakpal

Real life poem with short story in Marathi .

Episodes

  1. May 21

    अधुऱ्या प्रेमाच्या गोष्टीला तो क्षण पुरेसा होता.

    त्या संध्याकाळी आम्ही  न ठरवताच भेटलो भेटीची ओढ एवढी होती की सर्व वीश्वच विसरलो खळखळून वाहनारा तो समुद्र आज शांत होता मावळत्या सुर्यनेही त्याचा  लाल गुलाबी रंग छेडला होता दगडावर आपटनाऱ्या लाटांचा आवाज कानात  गुनगुनत होता मध्यानंतरानंतर ही मावळता सुर्य जणू आम्हालाच पाहत होता निशब्द त्या क्षणाला डोळ्यांनचा अबोला तुटला होता हात त्याने हातात घेताच ह्यदयाचा ठोका चुकला होता गढद होणाऱ्या अंधाराबरोबर वाराही बेभान झाला होता कवेत त्याने ओढताच मला अंगावरू काटा शहारून आला होता चंद्र  ही जणू हसुन चांदण्यांचा  वर्षाव करत  होता आमच्या अधुऱ्या  प्रेमाच्या गोष्टीला  तो क्षण पुरेसा होता..........

    2 min
  2. 06/18/2022

    Fathers day

    चाहूल  लागताच  नव्या  पाहुण्याची तो आनंदाने  नाचतो  रोज नवीन नवीन स्वप्नांची सांगड  घालत असतो मुलगा झाला तर अस करेन, मुलगी  झाली तर तसं करेन म्हणतं असतो. ते  नऊ  महिने  त्याच्या  स्वप्नात   त्याचा  चेहरा तो बनवत  असतो आतुरता  त्याला हि आई  एवढीच  असते डोळ्यात  पाणी  त्याच्याही दाटून येत  असते स्पर्श होता त्याचा  तो सर्व दुःख  विसरतो  जगण्यासाठी त्याला आता नवा मार्ग  मिळतो. आई  ऐवढीच  त्यालाही काळजी खूप असते बाप  म्हणून  जबाबदारीची  जाणीवहि असते  वेळ  देता येत  नाही म्हणून  चीड चीड त्याची होते  भविष्याची त्याच्या तरतूद  त्याची  चालू  असते अस्तित्व  त्याचहि  आई  एवढेच  असते बाप  म्हणून  मिरवताना  त्याला खूप आवडते  कठोर  शद्बातहि त्याच्या माया खूप असते.  कधी   बाप तर कधी  मित्र  म्हणून त्याची  ओळख असते .

    2 min
  3. 06/18/2022

    आयुष्यावर बोलून काही

    आयुष्य  म्हणजे  पाणी , प्रवाह  मिळेल तसं वाहवत  जाणार ,  कधी न थांबणार.  आयुष्य म्हणजे शाळा , शेवट  पर्यन्त  शिकत  राहायच,  प्रत्येक  वळणावर  परीक्षा  देत राहायच. आयुष्य म्हणजे चांगले  तर कधी वाईट  अनुभव  घेते राहायचे,  आणि दुसर्यांनाही  देत राहायचे.  आयुष्यावर बोलू काही प्रवाहाबरोबर  वाहवत जाई  कधी शांत तर कधी खळखळ  आयुष्यावर  बोलू काही अशी शाळा  ज्याला वर्गच  नाही परीक्षा  मात्र रोजच होई  आयुष्यावर  बोलू काही अनुभव  याचा खूप निराळा  कधी चेहऱ्यावर  हसू येई  कधी अश्रूंची फुले होई  आयुष्यावर  बोलू काही.  आयुष्य  हे असं जगावं  मेल्यावरही जिवंत  राहावं  आयुष्याने  पुन्हा म्हणावं   आयुष्यावर  बोलू काही,  आयुष्यावर  बोलू काही.  मला वाटत  आयुष्य असं जगावं कि मेल्यावरही  जिवंत राहाव. मिळालेल्या  सर्व अनुभवातून शिकून  पुढे  जाण्याचा  प्रयत्न  करत राहायचे , कधी कोणाचा  अपमान  होणार नाही याची काळजी घ्यायची,  आपल्याकडे जे आहे त्यातून जमत असेल तर दुसऱ्यांना मदत करायची.  प्रवास  हा खडतर  आहे, आणि तोच कसा सुखकर होईल त्याचा सतत प्रयत्न  करत  राहायचे .

    2 min

About

Real life poem with short story in Marathi .